शासन आपल्या दारी योजनेचे पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

शासन आपल्या दारी योजनेचे पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - शासनाने जाहीर केलेल्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची प्रशासनाची जबाबदारी असते.नागरिकांना कमी वेळेत एकाच छताखाली सर्व विभाग एकत्र आणून योजनांचा लाभ गतीमान पध्दतीने देण्यासाठी शासन आपल्या दारी ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजीराल सावंत यांनी दि.५ जून रोजी केले.

नगर परिषदेच्या नाटय गृहात आयोजित जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ते सावंत बोलत होते. यावेळी आ ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.


पुढे बोलताना मंत्री सावंत म्हणाले की, नागरीकांना सहकारी योजना व कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हे शासन आपल्या दारी  या उपक्रमाचा उद्देश आहे. तर शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून  होत असल्याचे त्यांनी सांगितले.


    यावेळी त्यांच्या नाट्यगृहात  लावण्यात  आलेल्या वेगवेगळ्या विभागांच्या स्टॉल्सवर भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली येणाऱ्या नागरिकांना प्रत्येक योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आलेल्या नागरिकांना योजनेची माहिती द्यावी. त्यांना येणाऱ्या अडचणींना सोडविण्याचे प्रयत्न करावे असेही त्यांनी नमूद केले. तसेच शासन आपल्या दारी उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्‍याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला असून या माध्यमातून सरकारला थेट लोकांच्या दारात आणून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !