आई येडेश्वरी देवस्थान विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक - आ. पाटील

आई येडेश्वरी देवस्थान विकासासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक - आ.  पाटील 

धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील येरमाळा येथील आई येडेश्वरी देवस्थानच्या विकासासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत ४.९० कोटी रुपये निधी मंजूर आहे. त्यामुळे तेथे करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी दि. ७ सप्टेंबर रोजी दु १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
सन २०१३ मध्ये आ पाटील त्यांच्या प्रयत्नातून या देवस्थानाला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यात आला होता. देवस्थानच्या विकासासाठी यापूर्वी देखील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला आहे. तसेच मंदिरालगत वन विभागाची जागा असल्यामुळे विभागीय वन अधिकारी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांना देखील या बैठकीसाठी आवर्जून आमंत्रित करण्यात आले आहे. पालखी मार्ग रस्ता, विद्युतीकरण यासह भाविकांच्या सोयी-सुविधा व परिसर सुशोभीकरणाची कामे या निधीमधून केली जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटणाला चालना देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री येडेश्वरी देवस्थानच्या विकासासाठी निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. 
या बैठकीस उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, विभागीय वन अधिकारी औरंगाबाद, कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग उस्मानाबाद, अधीक्षक अभियंता महावितरण, देवस्थानचे विश्वस्त, सरपंच, ग्राम विस्तार अधिकारी यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असून ग्रामस्थ व भाविकांनी देखील त्यांच्या काही सूचना असल्यास या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !