संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात एक महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे सर्व पिके करपून गेली आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी युवा स्वाभिमानी पार्टीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.


दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांसह संपूर्ण पिके वाळली असल्यामुळे १०० टक्के पीक विमा रक्कम देण्यात यावी. तर राज्य शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रूपये व बागायती शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १ लाख रूपये सरसकट अनुदान तात्काळ देण्यात यावे. तसेच कामगार व मजुरांना दुष्काळी मदत म्हणून २५ हजार रूपये प्रती कुटुंबाला देण्यात यावी. त्याबरोबरच जिल्ह्यातील शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुल्क व फिस माफ करून दुष्काळी मदत म्हणून प्रती विद्यार्थी २० हजार रूपये देण्यात यावी. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून दखल घेऊन तात्काळ संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मळगे, माजी सरपंच शिंदे व बबन राऊत यांनी केली आहे.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !