जरांगे यांच्या सभेसाठी चेअरमन अभिजीत पाटील यांचे मोठ योगदान
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे भव्य सभा आयोजीत केली होती. त्या सभेसाठी पंढरपूर आणि मंगळवेढा भागातून हजारो कार्यकर्ते गेले होते. त्या कार्यकर्त्यांना लागणाऱ्या वाहनासाठी डिझेलची व्यवस्था कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यांवर हजारो कार्यकर्त्यांच्या अल्पोपहराचीही व्यवस्था विठ्ठलचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे धाडशी नेते अभिजीत पाटील यांनी केली होती.
चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावतीने धाराशिव साखर कारखाना येथे अंतरवली सराटी येथील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी या भागातून जाणाऱ्या जवळपास ५० हजार कार्यकर्त्यांना चहा नाश्ताची सोय करून दिली होती. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जवळपास ५३५ गाड्यांना डिझेल टाकून देण्याची भूमिकाही मराठा समाजाचा प्रतिनीधी म्हणून केली आहे. त्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा भागातील मराठा समाजातून अभिजीत पाटील यांचे नाव प्राधान्याने घेतले जात आहे.
मागील काही वर्षापासून उद्योजक पाटील यांनी समाजकारण करत असताना आता थेट राजकारणात उडी घेतली आहे. त्यांच्याकडे दानत असल्याने राजकारणातही त्यांना मोठ्या प्रमाणात यश येत आहे.
मागील काही वर्षांपासून कोणत्याही सामाजिक कार्यात सढळ हाताने मदत करण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. प्रत्येक समाजाच्या विविध कार्यक्रमासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन विविध कार्यक्रम भरवून जनमानसात अभिजीत पाटील यांची प्रतिमा उंचावली आहे. त्याचा फायदा त्यांना आगामी काळात नक्की होणार आहे. हे मात्र नक्की झाले आहे.
- Get link
- X
- Other Apps