आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याचा आदेश रद्द करण्यात यावा - दुधगावकर


आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याचा आदेश रद्द करण्यात यावा - दुधगावकर 


धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याबाबतचा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस‌ (शप) च्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दि.१२ ऑक्टोबर रोजी राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे दिला आहे.


 दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील सामान्य जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी मागील ७० वर्षात सरकारने अनेक प्रकारे प्रयत्न करुन रुग्ण सेवा सामान्य मानसाच्या घरापर्यंत पोहचविण्याचे काम केले. त्याद्वारे आरोग्याची सेवा केली. तर विद्यमान सरकारने ४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर ५ वर्षाच्या कालावधीसाठी चालविण्यास देण्याबाबत आदेश पारीत केले आहेत. याच धरतीवर राज्य सरकार इतर जिल्ह्यातही लागू करु इच्छीत आहे. ते खाजगीकरण थांबवावे व विना मोबदला आरोग्य सेवा सामान्य माणसाला उपलब्ध करुन द्यावी. तसेच जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, युनानी व आयुर्वेदीक रुग्णालय या सर्व ठिकाणी डॉक्टर आरोग्य कर्मचारी कमतरता व औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोग्य विभागातील रुग्णसेवा विना विलंब सुधारणा करुन कंत्राटी पदावर डॉक्टर व इतर कर्मचारी भरण्याचा शासन आदेश रद्द करावा अन्यथा या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. 


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !