जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची भाजपची मागणी उशिरा सुचलेले शहाणपण
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची भाजपची मागणी
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, सर्व विरोधी पक्षांनी ही मागणी लावून धरल्यानंतर सत्ताधारी असलेल्या पक्षाला ही मागणी करण्याची वेळ आली आहे. उशिरा सुचलेले शहाणपण अशीच अवस्था व शेतकऱ्याप्रती अनास्था असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
यावेळी भाजप किसान मोर्चचे प्रदेश सचिव रामदास कोळगे, भाजपचे जेष्ठ नेते सुधाकर गुंड गुरूजी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रवीण पाठक, नाना कदम, भारत डोलारे, डॉ गोविंद कोकाटे, दत्ता सोनटक्के, आनंद भालेराव, किशोर पवार, अभय इंगळे, प्रसाद मुंडे, धनराज नवले, व्यंकटेश कोळी, गिरीष पानसरे, अजिंक्य जगताप, अमोल घोळवे, किशोर तिवारी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps